मुंबई : कसारा आणि उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली असून अनेक प्रवासी रेल्वे व लोकलमध्येच अडकले आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/