दापोली येथे असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत या कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी पावसाळ्यानिमित्त महाबळेश्वर येथे सहलीला जात होते. या सहलीसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. दरम्यान आंबेनळी घाटात या बसला भीषण अपघात झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली. या अपघातामध्ये बसचा पार चेंदामेंदा झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून प्रकाश सावंत देसाई हे या अपघातातून चमत्कारिकरित्या बचावले. खोल दरीतून वर आल्यावर त्यांनी मोबाईलवरून फोन करून विद्यापीठातील अधिकाऱ्यांना या बस अपघाताविषयी माहिती दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/