यानंतर मी या विषयावर वाचन आणि चर्चा करायला सुरुवात केली; शोधनिबंध अभ्यासले. समोर आलेली माहिती खूप अस्वस्थ करणारी होती. भारतात २५ ते २८ टक्के मुले रस्त्यांवर राहतात. यातील बरीचशी मुले ड्रग्स, दारूसारख्या व्यसनांना बळी पडतात. पाच-सहा वर्षांपूर्वी अंमली पदार्थांचे व्यसन ही प्रामुख्याने रस्त्यावरील मुले, बालकामगार, पळवून आणलेली मुले यांची समस्या होती. परंतु, आज भारतात ही समस्या त्यापेक्षा कितीतरी व्यापक झालेली आहे. वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक गटांतील शालेय मुले या समस्येचा भाग झालेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अंमली पदार्थांचे पहिल्यांदा सेवन केले जाण्याचे वय वेगाने घटत चालले आहे; काही ठिकाणी अगदी पाच वर्षांपर्यंतही खाली आलेले आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की, आपल्या देशात सामाजिक व राजकीय पातळीवरचे कितीही कडक निर्बंध घातले तरी अंमली पदार्थांच्या तस्करीवर व ते सहजपणे उपलब्ध असण्यावर आळा घालण्यात पुरेसे यश येत नाही.
सिगारेट, दारू व अंमली पदार्थांच्या कह्यात आलेली तरुण मुले अकाली, असुरक्षित लैंगिक कृती, आक्रमकता, अपयश, शिक्षण अर्धवट सोडणे, गुन्हेगारी अशा चुकीच्या व धोकादायक वर्तनात अडकण्याची शक्यता वाढते. त्यातून पुढे अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक समस्या उद्भवू शकतात. मुलांनी अशा अपायकारक पदार्थांकडे ओढले जाण्यापाठीमागची कारणे काही अभ्यासकांनी मांडली आहेत. यात प्रामुख्याने चुकीच्या संगतीचा प्रभाव, अनुवंशिकतेचा व आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम, कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक-सामाजिक बदल, मनोसामाजिक अवस्थेतून उद्भवणारे अपायकारक वर्तन अशी जगभरात सर्वत्र आढळणारी करणेच भारतीय समाजालाही लागू पडतात असे दिसते.
जागतिकीकरणाच्या या दुष्परिणामांचा विचार पालकांनी खूप गांभीर्याने करणे गरजेचे आहे-
१. मुलांना लहानपणापासूनच विधायक व सकारात्मक कृतींमधून आनंद मिळवण्याचे शिक्षण देणे. यातून चांगल्या सवयींची जोपासना होते.
(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/