'राम मंदिरच का ?' पुस्तकाचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019
Total Views |


 


ठाणे : 'पै फ्रेन्डस् लायब्ररी'च्या सौजन्याने, नाविन्य प्रकाशन, पुणे प्रकाशित डॉ. सचिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित लिखित राम मंदिरच का ?’ या ऐतिहासिक संदर्भ, पुरातत्वीय पुरावे आणि डाव्यांचा कावा दाखवून देणार्‍या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता डोंबिवली पूर्व येथील शास्त्री हॉल, टंडन रोड, आयोजित केला आहे. पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते मनोज जोशी करणार असून ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधीर जोगळेकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@