शिवसेनेनेच मराठी माणसाला लुटले : अंजली दमानिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |


मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना (BKS) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही ह्याचा प्रत्येय गिरणी कामगारांना, खांबटा कामगारांना आणि आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आला. मराठी मराठी म्हणत मराठी माणसाला लुटले. सगळ्या कामगार युनियनने त्यांचा बहीष्कार करायला हवा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

 
 
 

नऊ दिवस सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप बुधवारी दुपारी अखेर मिटला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सुनावणीवेळी कर्मचाऱ्यांना संप मिटवण्यास सांगत प्रशासनानाच्या मागण्या मान्य करत बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत विलीन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

 

संपकऱ्यांनी काल झालेला संक्रांतीचा सणही साजरा केला नसून त्यांचा प्रस्थापित प्रशासनाविरोधात रोष दिसून येत आहे. शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करत मराठी माणसांनाच लुटल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@