आता ही उच्च स्तरीय समिती बेस्ट बाबतचा आपला अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार आहे. तसेच पालिकेत बेस्टचे विलीनीकरण करायचे की नाही, याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. असे आश्वासन उच्च स्तरीय समितीकडून बेस्ट कृती समितीला देण्यात आले. एकीकडे मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडली. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले.
मनसेने आक्रमक पवित्रा घेत कोस्टल रोडचे काम बंद पाडले. बेस्टच्या संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरु होऊ देणार नाही. अशी भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट संपाबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. बेस्ट संप लवकरात लवकर मिटविण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेकडूनही सकारात्मक संकेत मिळत आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे संक्रांतीच्या मुहूर्तावर राज्य सरकार बेस्ट कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/