यवतमाळ : “अडचणीच्या काळात दिल्लीतली नाय, गल्लीतली बाय कामी येते”, असे उद्गार आत्महत्या केलेल्या शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी यांनी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनात काढले.“माझा या जन्मावर विश्वास आहे…त्यामुळे मी रडत नाय तर लढतेय, असे भावोद्गार त्यांनी काढले.पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन, असे वाटून पतीने आत्महत्या केली होती. खरी पण मी हीच वायद्याची शेती, फायद्याची करून दाखवेन, असा विश्वास मला आहे, असे त्यांनी नमूद केले.
- संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरेंच्या भाषणाला सुरुवात
- अरुणा ढेरे यांच्या भाषणाचे मुद्दे
- जाज्वल्य हवे तुमचे विचार भाषा नको हा वारसा घेऊनच मी इथवर आले
- संमेलनाला वेठीला धरणाऱ्यांचे आपण बळी ठरलो.
- साहित्य संमेलन ही विचारांची पंढरी आहे.
- झुंडशाहीच्या धमक्यांपुढे वाकणं हे आज परवडणारा नव्हे : अरुणा ढेरे
- नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे ही आयोजकांची मोठी चूक
यवतमाळमध्ये होत असलेले ९२ वे साहित्य संमेलन वादग्रस्त ठरले होते. मात्र, शुक्रवारी नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी ग्रंथ दिंडी निघाली आणि वाजत गाजत संमेलन स्थळी पोहोचली. साहित्य रसिकांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होत. त्यानंतर ध्वजारोहन होऊन ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही पार पडले. दुपारी ४ वाजता मुख्य संमेलनाच्या उद्घाटन होणार आहे, संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली येडे या करणार असून मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाची सूत्रे डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे देणार आहेत.
वैशाली येडे यांनी भाषण करण्याचे ठरवले आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, आत्महत्येनंतर त्यांच्या मागे असलेल्या मुलाबाळांची, पत्नी आणि कुटुंबियांची अवस्था वाईट होते आदी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि व्यथा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मांडण्यास मदत होईल, असे विश्वास आयोजकांना आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषा व सांस्कृतीक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्याही भाषणाची उत्सुकता साऱ्यांना आहे.
यवतमाळ, ९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अपडेट्स
वैशाली येडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनसंमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेेरे यांच्या भाषणाची उत्सूकता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्व साहित्यिकांनी अभिवादनसर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रदर्शानेचेही उद्घाटन पार पडले.पुस्तक प्रदर्शनात देशातील अनेक प्रकाशनांचे पुस्तके मांडण्यात आलेत.यवतमाळच्या नागरिकांचा उत्तम प्रतिसादसाहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीचा समारोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीतउद्घाटिका वैशाली येडे, संमेलना अध्यक्षा अरुणा ढेरे, कांचन चौधरी, महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण