मुंबई: गेले चार महिने दुरुस्तीसाठी बंद असलेला मुंब्रा बायपास १० सप्टेंबरपासून चालू करण्यात येणार आहे. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडेल.
८ मे पासून हा रास्ता दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे ठाणे तसेच नवी मुंबईमधील मार्गामध्ये प्रचंड बदल करण्यात आले होते. जड वाहतूक ऐरोली आणि कल्याणमार्गे वळवल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत होते. या मार्गामुळे आता ठाणे व नवी मुंबईवरील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/