'एखादी व्यक्ती आजाराने ग्रासलेली असेल व त्या व्यक्तीला इच्छामरण हवे असेल. तर ती व्यक्ती इच्छामरणाचे मृत्युपत्र बनवू शकते'. असे ते म्हणाले. तसेच 'अंतिम श्वास कधी घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु त्या कोणाच्याही दबावाखाली येऊन ती व्यक्ती हे करत नसावी'. हेही त्यांनी स्पष्ट केले. याच वर्षी ९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने इच्छामरणाविषयी ऐतिहासिक निर्णय दिला होता. इच्छामरणाच्या मृत्युपत्राविषयी मार्गदर्शक तत्वे या खंडपीठाने घालून दिली होती. तसेच शेवटचा श्वास कधी घ्यायचा याचा अधिकार मात्र मरणासन्न व्यक्तीलाच असेल असे नमूद करण्यात आले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/