अंतिम कसोटी सामन्यासाठी भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. या कसोटी सामन्यासाठी पृथ्वी शॉची जोरदार चर्चा सुरु असताना हनुमा विहारीला संघात स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विहारी हा २०१२ च्या अंडर १९ विश्वविजेता संघाचा एक महत्वाचा खेळाडू होता. भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा तो २९२ खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आजच्या कसोटीसाठी रवींद्र जडेजादेखील संधी मिळाली आहे. दरम्यान, या अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/