एक राष्ट्र एक ओळखपत्र सेवा लवकरच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |



नवी दिल्ली: भारतामध्ये लवकरच एक राष्ट्र एक ओळखपत्र या सेवेची सुरुवात होईल, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी माहिती दिली. या सेवेमुळे राष्ट्राची दळणवळण सेवा अखंडित होईल व याचा फायदा आर्थिकव्यवस्थेला होईल असाही विश्वास त्यांनी दर्शवला. पुढे माहिती देताना कांत यांनी असेही सांगतले की, एक मजबूत वाहतूक क्षेत्र कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मुख्य आधार आहे. विशेषत: भारतासारखा घनदाट रहिवाशी असलेला विकासशील राष्ट्र हा राष्ट्राच्या गतिशील धोरणाचा केंद्रबिंदू असून सार्वजनिक वाहतुकीच्या टिकाऊ रीतींवर अवलंबून होता.

 

फ्यूचर मोबिलिटी सम्मिट २०१८ मध्ये पुढे सीईओ म्हणाले, "मजबूत वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असतो. नवीन व्यवस्थेचा हेतू नागरिकांना सार्वजनिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. यासाठी पुढच्या पिढीची वाहतूक व्यवस्था बनवली पाहिजे."

 

अमिताभ कांत यांनी सांगितले की, "भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) वाहतूक केवळ ४ टक्के आहे. ही वाहतूक बहुतेक पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून आहे. देशाच्या मोठमोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण होण्यामागे गाडयांचा वापर हे एक मोठे कारण आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीमुळे देशाच्या चलन साठवणांवर देखील परिणाम होतो."

 

नीती आयोगचे सल्लागार अनिल श्रीवास्तव यांनी कार्यक्रमात सांगितले की, "पर्यावरणविषयक दृष्टिकोणातून सरकार वाहतूक यंत्रणेवर काम करत आहे. त्यामुळे लोकांनी खाजगी गाड्यांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनाचा उपयोग केला पाहिजे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@