मागील काही दिवसांपासून सीमेलगत व काश्मीरपरिसरात सैनिक व पोलिसांची अमानुष हत्या केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सिंह म्हणाले की, "तुम्हाला याबाबत माहिती नसेल मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सीमेवर काही तरी घडत आहे. भारतीय सैनिकांनी मोठी कारवाई केली असून सैनिकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. याबाबत मी आताच काही सांगणार नाही मात्र जे काही झालं आहे ते ठीक ठाक झालं आहे. लवकरच तुम्हाला याविषयी माहिती मिळेल."
यापूर्वी २०१६ साली भारतीय सैनिकांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ४ तळ नष्ट केले होते. सैन्याच्या याच जबरदस्त कामगिरीची आठवण म्हणून व या कारवाईला २ वर्ष पूर्ण झाल्यामुळे देशातील शाळांमध्ये ‘पराक्रम पर्व’ नावाने सर्जिकल स्ट्राइक दिवस साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/