सिनेमातील एका वाक्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. हे वाक्य न्यायव्यवस्थेच्या विरोधात असल्याचे सेन्सॉरचे मत आहे. परंतु सिनेमाच्या निर्मात्यांनी हे वाक्य सिनेमातून काढण्यास नकार दिल्याने सिनेमाच्या प्रदर्शनाला अडथळा निर्माण होतो की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिनेमातील ते वाक्य आम्ही काढणार नाही अशा आशयाचे एक पत्र निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाला ५ सप्टेंबर रोजी पाठवले होते. पण त्या पत्राला अद्याप सेन्सॉर बोर्डाकडून उत्तर मिळालेले नाही. या सिनेमात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. गरज असलेलेच संवाद सिनेमात दाखविण्यात आले आहेत. कायद्याचे उल्लंघन होईल असा कोणताच संवाद नसल्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी सांगतिले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/