पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतरही देश महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाळ उपाध्याय या तीन महापुरुषांना कधीही विसरणार नाही. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन प्रेरणादायक असून आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो. मात्र, गेल्या ७० वर्षांतील मतांच्या राजकारणामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले.”
“केंद्रात ज्यावेळी काँग्रेस आघाडीचे सरकार होते, त्यावेळी ज्या राज्यांत भाजपच्या नेतृत्वातील सरकारे होती, त्या राज्यांतील जनतेला काँग्रेस शत्रू समजत असे. ज्यांनी १०-१० वर्षं मध्य प्रदेशला व इथल्या जनतेला शत्रुत्वाची वागणूक दिली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. काही लोकांनी मध्य प्रदेशला नेहमीच प्रगतीपासून, विकासापासून दूर ठेवले. ज्या पक्षाने देशावर ५० ते ६० वर्षं राज्य केले, त्यांना भिंग लावून आता शोधावे लागत आहे. आता काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे.काँग्रेसच्या अहंकारानेच त्या पक्षाचा पराभव केला आहे. खुर्चीवर काही जण स्वतःचा वडिलोपार्जित हक्क समजतात,” अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर प्रहार केला.
मोदी पुढे म्हणाले की, “काँग्रेसला आता छोट्या छोट्या पक्षांच्या पाया पडावे लागत असून काँग्रेस नेत्यांनी वेळीच आत्मचिंतन केले असते तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती. आम्ही पैशाने नव्हे, तर जनतेच्या शक्तीच्या बळावर निवडणुका लढतो. मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेस तिहेरी तलाकची प्रथा बंद करू इच्छित नाही. काँग्रेस देशासाठी एक ओझे झाले असून त्या पक्षाने शब्दकोशातल्या सर्वच शिव्यांचा माझ्याविरोधात वापर केला. माझ्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही, परंतु काँग्रेस जेवढी अधिक चिखलफेक करेल तेवढी अधिक कमळं फुलतील,” असे मोदींनी स्पष्ट केले.
एनआरसी थांबणार नाही
- अमित शाह, भाजप अध्यक्ष
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/