हिमाचल प्रदेशातील हवामान सध्या खराब असून तेथे सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. कुल्लू, कांगरा आणि चम्बा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एकूण ५ जणांची मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी भूस्खलनदेखील झाले आहे. सोमवारी तेथील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. कांगरा, कुल्लू आणि हमीरपूर जिल्ह्यात सुरक्षेसाठी आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/