अतिरेक्यांचा सर्जिकल स्ट्राईक करावाच लागेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018
Total Views |

 

 
 
 
 
लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा इशारा
 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये वाढते अतिरेकी हल्ले पाहता आता अतिरेक्यांचा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल असा इशारा भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. जम्मू-काश्मीर मधील ३ पोलिसांना ठार केल्यामुळे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी हा इशारा दिला. एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

 

पाकिस्तानी सेना आणि आएसआयवर पाक सरकारचे वर्चस्व जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तान सीमेवरील हा तणाव कमी होणार नाही. नैराश्यातून अतिरेक्यांनी पोलिसांना टार्गेट करत आहेत. जम्मू काश्मीरमधील खोऱ्यात भारतीय लष्कराचे सर्च ऑपरेशन चालूच राहील. असे ते म्हणाले. या सगळ्यामुळे काश्मीरमधील जनसामान्यांना मात्र हाल सोसावे लागत आहेत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. फुटीरवाद्यांचे नातेवाईक मात्र परदेशात आनंदाने राहत असल्याचेही ते म्हणाले. काश्मीरमधील रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना दहशतवादी बनण्यास भाग पाडले जात आहे. काश्मीरमधील ही सद्यपरिस्थिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी निदर्शनास आणून दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@