नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या सीमेरेषेवरील कुरापती वाढत चालल्या आहेत. गेल्या आठवड्यात भारत पाकिस्तानच्या सीमेवर दहशतवाद्यांकडून हल्ले झाले. यामध्ये भारताचे पोलीस अधिकारी, भारतीय जवान आणि आमदारांची सुद्धा हत्या करण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून भारतीय सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांमध्ये ५ दहशतवादींना ठार केले आहे.
रविवारी २३ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. त्यानंतर सोमवारी २४ तारखेला ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र कुपवाड्यातील चकमकीदरम्यान एक जवान शाहिद झाले आहेत. रविवारपासून आतापर्यंत या भागात भारतीय सैनिकांनी एकूण ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अजूनही सैनिकांची शोध मोहीम सुरु आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/