पोलिसांच्या गोळीबारात अभाविपच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |

 

 
 
पश्चिम बंगाल : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) दोन कार्यकर्त्यांचा पोलिसांच्या लाठीचार्ज दरम्यान मृत्यू झाला आहे. राजेश सरकार आणि तपन बर्मन असे या दोघांची नावे आहेत. तर अनेक विद्यार्थी कार्यकर्ते या लाठीहल्ल्यात जखमी झाले आहेत. बंगाल सरकार व पोलिसांच्या या अमानुष कृत्याविरोधात देशभरात संताप दिसून येत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात देशभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
 

उत्तर बंगाल भागातील दिनाजपुर जिल्ह्यातील दीराभीत हाईस्कूलमध्ये नवीन शिक्षकांच्या भरतीवरून ही घटना घडली. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, दीराभीत हाईस्कूलमध्ये नवीन तीन शिक्षकांची भरती केल्यावरून नाराज अभाविपच्या विद्यार्थ्यांनी संवैधानिक मार्गाने हे आंदोलन पुकारले होते. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला व गोळीबार केला. यात दोन विद्यार्थी कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. तर १० विद्यार्थी जखमी आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@