या विधेयकात काही नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
१. तिहेरी तलाक हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे.
२. पतीने तीन वेळा तलाक हा शब्द उच्चारून तलाक दिल्यास पत्नी किंवा तिचे नातेवाईक तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल करू शकतात.
३. पीडित पत्नी पतीसोबत तडजोड करण्यास तयार असेल तर न्यायाधीश आपल्या अधिकाराचा वापर करून समस्येवर तोडगा काढू शकतात. अशावेळी गुन्हा मागे घेता येऊ शकतो.
४. मॅजिस्ट्रेट आरोपीला जामीन मंजूर करू शकतील. या विधेयकाच्या तरतूदींनुसार, पती-पत्नीला भरपाई देण्याच्या मुद्यावर सहमत असेल तेव्हा मॅजिस्ट्रेट जामीन मंजूर करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेतील. भरपाईची रक्कम मॅजिस्ट्रेट ठरवतील. मॅजिस्ट्रेट पती-पत्नीतील वाद मिटवण्यासाठी आपले अधिकार वापरू शकतील, असेही यात म्हटलं आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/