आमदार किसन कथोरे अभिष्टचिंतन
सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रशासकीय कार्यालयांमधून होत असते. लोकशाही व्यवस्थेचे केंद्रस्थान मानल्या जाणार्या या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर प्रशासकीय कामकाजात खर्या अर्थाने गतिमानता आणता येईल, या हेतूने मुरबाड बदलापूरचे आ. किसन कथोरे यांनी प्रशासकीय इमारतींचा चेहरामोहरा बदलला आहे. अंबरनाथमध्ये आ. किसन कथोरे यांनी प्रशस्त प्रशासकीय भवन उभारून राज्यात नवा आदर्श घडविला होता. हीच क्रिया त्यांनी मुरबाडमध्ये करावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मुरबाडकरांची ही इच्छा कथोरे यांनी पूर्ण केली आहे. विदेशात गेल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेत तिथल्या कार्यालयात्मक सौंदर्यप्रधान रचना तिथे वास्तुविशारदांच्या कल्पकतेतून खाजगी व सरकारी वास्तुप्रसाद पाहून आपलं मन प्रसन्न होते. तेथे व्यवस्था या जनसामान्यांसाठी असतात. तेथील मांडणी व रचना आकर्षक असेल तर येणार्यांचा मनोभाव सकारात्मक असतोच. आपल्याकडील शासकीय कार्यालये बघितली की तेथून काढता पाय घेण्याचा सहज भाव आपल्यात उत्पन्न होतो. ग्लोबलायझेशनचं पर्व 91 च्या दशकात सुरू झालं असलं तरी आपली शासकीय कार्यालये अद्याप पारंपरिक पद्धतीत अडकलेली आहेत. फायलींचे ढिगारे इतस्ततः पडलेले, मोडकळीस आलेली कपाटे, अपुर्या खुर्च्या अन् नकारात्मक जाणिवेचे प्रश्नार्थक मुद्रेत बसलेले कर्मचारी पाहून सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांचा कामासाठी जाण्याचा सोपस्कार नकोसा वाटतो.
सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रशासकीय कार्यालयांमधून होत असते. लोकशाही व्यवस्थेचे केंद्रस्थानमानल्या जाणार्या या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर प्रशासकीय कामकाजात खर्या अर्थाने गतिमानता आणता येईल, या हेतूने मुरबाड बदलापूरचे आ. किसन कथोरे यांनी प्रशासकीय इमारतींचा चेहरामोहरा बदलला आहे. मुरबाड हा शेतीप्रधान तालुका आहे. येथील बहुसंख्य शेतकरी आपल्या जागेच्या कामकाजासाठी तहसीलदार कार्यालयात येतात. मात्र या कार्यालयात अपुरी जागा असल्याने शेतकर्यांना आणि नागरिकांना कार्यालयाबाहेर उभे राहावे लागते. तसेच येथे काम करणार्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना कामासाठी पोषक वातावरण नाही. तसेच ही वास्तू जुनी झाल्याने त्याचा त्रास सर्वांनाच होत होता. मुरबाडमध्ये प्रशस्त तहसीलदार कार्यालय असावे, ही सर्वांचीच इच्छा होती. अंबरनाथमध्ये आ. किसन कथोरे यांनी प्रशस्त प्रशासकीय भवन उभारून राज्यात नवा आदर्श घडविला होता. हीच क्रिया त्यांनी मुरबाडमध्ये करावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मुरबाडकरांची ही इच्छा कथोरे यांनी पूर्ण केली आहे. मुरबाड तालुक्याचे तहसीलदार कार्यालय हे अपुरे पडत असल्याने आ. किसन कथोरे यांनी नव्या प्रशस्त इमारतीचा प्रस्ताव तयार करून तो मंजूर केला आहे. या नव्या वास्तूचे संकल्पचित्र पाहिल्यावर ही शासकीय इमारत नव्हे तर एखादा राजवाडा असल्याचा भास होतो. जागतिकीकरणाच्या युगात सध्या सर्वत्र खाजगीकरणाचा बोलबाला आहे. सार्वजनिक उपक्रमांमध्येही खाजगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. मात्र कार्यतत्पर आणि कल्पक दृष्टिकोन असेल तर ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब,’ ही म्हण खोटी ठरविता येते. हे आ. किसन कथोरे यांनी शासकीय इमारतींचा कायापालट करून दाखवून दिले आहे.
थितबी होणार पर्यटनग्राम
उपरोक्त विविध योजनांमुळे माळशेज आता महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर ठळकस्थानी असणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महानगरांपासून जवळ असल्याने देश-विदेशांतून येथे पर्यटक येतील. घाटमाथ्यावरील एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये त्यांच्यासाठी पंचतारांकित सुविधा असतील. शिवाय, पायथ्याशी असणार्या थितबी गावात आदिवासी संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना घडेल. येथे पर्यटकांना आदिवासींच्या कुडाच्या झोपडीत राहण्याचा आनंद घेता येणार आहे. अर्थात या झोपड्याही अद्ययावत सुविधांनी युक्त असणार आहेत. आदिवासी कला संस्कृतीची ओळख येथे पर्यटकांना करून दिली जाणार आहे.
बारवी डॅमजवळ इको -टुरिझम
बारवी धरणाच्या शेजारी वनविभागाच्या माध्यमातून इको-टुरिझमचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून धरणाच्या परिसरात उद्यान विकसित करण्यात येणार आहे. तसेच जंगल लष्करी वनखात्याच्या माध्यमातून साकार करण्यात येत आहे. एक आगळावेगळा पिकनिक स्पॉट येथे साकारण्याचा आ. किसन कथोरे यांचा प्रयत्न आहे.
मुरबाडचा ‘अर्थ’ चेहरा बदलतोय...
नेतृत्व हे जमिनीचं असलं की, त्या मातीच्या प्रश्नांची आत्मजाण आपसूकच नेतृत्वाला असते. कथोरेंचा जीवनप्रवास हा त्या आत्मजाणिवेची पाऊलवाट म्हणावी लागेल, म्हणून गोरगरिबांचे प्रश्न सोडविताना ते लोकांमध्ये घरातल्या कुटुंबातल्या कर्त्याप्रमाणे राहिले. ग्रामीण भागाचा कायापालट व्हावा, इथे आर्थिक सुबत्ता यावी व शेती व्यवसायाला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी कृषिक्षेत्रात या मतदारसंघात प्रचंड काम केले आहे. वर्षानुवर्षे रखडलेले सिंचनाचे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले. मुरबाड मतदार संघाची भौगोलिक रचना निसर्गात या अडीच तालुक्यांच्या विभागणीत झाली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं निर्सगलेणं या भागाला माळशेज घाटाच्या स्वरूपात लाभलं आहे. काळू, भातसा, बारवी या नद्यांनी हा भूपृष्ठ समृद्ध झाला आहे. असे असले तरी मुरबाड मतदार संघाच्या परिक्षेत्रातील दरडोई उत्पन्नाचा मानवी निर्देशांक अत्यल्प असा आहे.
शिक्षणातून सामाजिक विकास
आजच्या जमान्यात दप्तराच्या ओझ्याची मोठी चर्चा होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विचारमंथन व उपाययोजना हाती घेण्यात येत आहे, पण सन 1997 साली किसन कथोरेंनी पाटी दप्तराविना शाळा उपक्रम सुरू करून तो यशस्वी केला. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, दर्जेदार स्वरूपात मिळत असताना बदलत्या वैश्विक शिक्षणपद्धतीनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी कल्याण तालुक्यात दोन, मुरबाडमध्ये दोन व बदलापूरमध्ये तीन व अंबरनाथमध्ये चार वरिष्ठ महाविद्यालयांना मंजुरी मिळवून घेतली.