समृद्धी मार्गातून मराठवाड्याचा विकास : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 
 
औरंगाबाद : मराठवाड्याला अजूनही विकासाची भूक आहे, या भागाला मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे. राज्य सरकार मराठवाड्याच्या विकासाची भूक भागवणार असल्याचे प्रतिपादन हैदाराबाद मक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. राज्य सरकारने मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आतापर्यंत १५ हजार कोटींहून अधिकचा निधी दिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई-नागपूर समृद्धी महमार्गातून सर्वांधिक विकास मराठवाड्याचा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. या महामार्गाच्या विकासातून औरंगाबाद आणि जालना हे जिल्हे उद्योगांचे आकर्षण ठरेल. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी छत्तीसगडसह इतर शेजारी राज्यांपेक्षाही कमी दरात मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासावर आधारित 'अग्रेसर मराठवाडा' या पुस्तिकाचं प्रकाशन केलं.
 
 

राज्य सरकारने मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढला असून अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत १५ हजार कोटींचा निधी दिल्याचे ते म्हणाले. दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू करताना एकूण शेततळ्यांपैकी ३५ टक्के शेततळी मराठवाड्यात बांधली गेली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठं काम मराठवाड्यात झालं आहे. यातून ६० हजार हेक्टर क्षेत्राहून अधिकचं सिंचन मराठवाड्यात हेऊ शकतं. याशिवाय मराठवाड्यात वॉटर ग्रीडद्वारे १४ प्रकल्पांचे पाणी उद्योग, सिंचन, शेती आणि पिण्यासाठी पुरण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@