निरीक्षक बी. एल. संतोष आणि विजय पुराणिक हे निरीक्षक पणजीत थांबले आहेत. राज्यातील भाजप नेत्यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी नेतृत्व बदलाचा सध्या तरी प्रश्न नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाली आहे. तेच सरकारचे नेतृत्व करतील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदाचा ताबा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर किंवा नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे जाईल, अशी चर्चा होती, त्याचीही सध्या गरज नसल्याचे खा. तेंडुलकर यांनी सांगितले. त्यामुळे पर्रीकरच पुन्हा नेतृत्व स्वीकारतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/