नवी दिल्ली : पाककडून खतपाणी घातल्या जाणाऱ्या दहशतवादाला रोखण्यासाठी सीमेवर आता अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री राजनाथ सिंह सोमवारी, दि. १७ सप्टेंबर रोजी जम्मू येथील प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने सीमेवर 'इलेक्ट्रॉनिक भिंत' उभी केली आहे. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर प्रथमच हायटेक सर्व्हीलन्स सिस्टिम उभारण्यात आली आहे. याच्या मदतीने जमीन, पाणी आणि हवेत एक अदृश्य इलेक्ट्रॉनिक बॅरियर उभरण्यात येणार आहे. यामुळे सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) घुसखोरांना ओळखण्यास आणि कठीण ठिकाणांवरील घुसखोरी रोखण्यास मदत मिळणार आहे. एका प्रकल्पानुसार, जम्मूतील ५.५ किमी सीमेवर देखरेख ठेवता येऊ शकते. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्टीग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम (सीआयबीएमएस), असे नाव देण्यात आलं आहे.
काय आहे सीआयबीएमएस यंत्रणा – पाकिस्तानच्या सीमेकडील ठिकाणांहून कायम रात्रीच्या वेळी दुर्गम भागातून भारतीय सीमेत घुसखोरी होते. अशा ठिकाणी सीआयबीएमएस यंत्रणा उभारून अनेक आधुनिक सर्व्हीलन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यात थर्मल इमेजर, इन्फ्रारेड आणि लेझर बेस्ड इन्ट्रुडर अलार्म सुविधा असतील. यानुसार जमिनीवर अदृश्य कुंपण, हवाई टेहळणीसाठी विमान आणि जमिनीखाली सेन्सर लावलेले असतील.
भुयारांद्वारे येणाऱ्यांवरही नजर - दहशतवादी जमिनीखाली भुयार खोदून भारतीय सीमेत घुसखोरी करतात. पण आता दहशतवाद्यांना हे शक्य होणार नाही. भूयार रेडार आणि सोनार सिस्टिममुळे नदी पात्रालगतची सीमा सुरक्षित केली जाईल. सर्व माहिती रिअल टाइममध्ये म्हणजे प्रत्येक क्षणाची माहिती तात्काळ कळत जाईल. यामुळे सुरक्षा दलांना दहशतावाद्यांची घुसखोरी रोखता येँणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/