इंद्रवदन सोसायटी कसा राबवते हा प्रकल्प?
दादर येथे असलेल्या या सोसायटीत १५० हून अधिक कुटुंबे राहतात. या घरांमधील कचऱ्याचे वर्गीकरण करुन ओला व सुका कचरा वेगळा करूनच एकत्र जमा केला जातो. त्यानंतर त्याच्यातील प्लॅस्टिक, रबर इत्यादी अजैविक कचरा वेगळा केला जातो. तरीही कचरा राहून गेला असल्यास तो मशीनमधून बारीक केला जातो. त्यानंतर तो कम्पोस्ट पिट्स मध्ये टाकला जातो. त्यावर विरजण टाकून भुश्याने ते झाकले जाते. अशाप्रकारे दर १५ दिवसांनी हे पिट्स भरले जातात. नंतर लोडिंग थांबवून कचरा कंपोस्ट केला जातो आणि महिन्याच्या शेवटी कच-याचे खतात रुपांतर होते. त्यानंतर ते पिट्समधून काढून एक – दोन दिवस उन्हात वाळवून चाळले जाते. त्यानंतर पॅक करून साठविण्यात येते. या कंपोस्ट खताचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/