काँग्रेसचा 'भारत बंद' फसला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |


 

नवी दिल्ली : महागाईच्या विरोधात काँग्रेस व काँग्रेस समविचारी पक्षांनी आज देशभरात बंद पुकारला होता. मात्र काँग्रेसच्या या बंदला देशातील जनतेने प्रतिसाद न दिल्याने काँग्रेसचा भारत बंद करण्याचा प्रयत्न फसला. या बंदला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी महागाईचे विरोध प्रदर्शन केले.

 

बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण

काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून अनेक ठिकाणी तोडफोड सुरु आहे. तर काही ठिकाणी टायर पेटवून रास्ता रोको करण्यात येत आहेत. या हिंसक आंदोलनात बिहार येथील एका दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून मुंबईमध्ये दिंडोशीत मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपा नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@