नेत्रचेतना यात्रेप्रसंगी चाळीसगावकरांनी अनुभवला 'अंधानुभव'मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्यावतीने ‘अंधानुभव देणारी नेत्रचेतना यात्रा’चे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018
Total Views |
 
 
 

नेत्रचेतना यात्रेप्रसंगी चाळीसगावकरांनी अनुभवला 'अंधानुभव'

मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्यावतीने ‘अंधानुभव देणारी नेत्रचेतना यात्रा’चे आयोजन

 जळगाव , १ सप्टेबर 

चाळीसगाव शहरात आयोजित नेत्रचेतना यात्रेला अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. शहरातील राष्ट्रीय कन्या शाळेपासून सुरुवात होऊन स्टेशन रोड मार्गे आ.बं.हायस्कूलच्या प्रांगणात सांगता करण्यात आली यात हरिभाऊ चव्हाण निवासी विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तर चाळीसगाव शहरातील १७ सामाजिक संघटना सामील झाल्या होत्या तर मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे प्रमुख सचिन चोरडिया, कार्यक्रम प्रमुख तुषार तोतला, संचालक विनोद पाटील आणि अनुया कक्कड तर व्यवस्थापक भानुदास येवलेकर, जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन, समाधान चौधरी उपस्थित होते.

नेत्रचेतना यात्रा केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगिलालजी बाफना नेत्रपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. यात दि. २५ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर यादरम्यान ३३ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने नेत्रपेढीच्या माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नेत्रदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात येते. यावेळी नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला यात २००१ मध्ये कृष्णा पाटील यांनी तर २००३ मध्ये गोवर्धन पाटील यांनी मरणोत्तर नेत्रदान केले होते त्यांच्या कुटुंबातील सद्स्यांना स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले.

नेत्रदानासाठी वयोमर्यादा नसून कोणीही नेत्रदान करु शकते. मृत्यूनंतर चार तासांत नेत्रदान करणे आवश्यक आहे असे नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रसाद पाठक यांनी सांगितले तर नेत्रदान करणाऱ्यांना मरणोत्तरही जग पाहता येते, नेत्रदान केल्याने अनेकांना दृष्टी मिळू शकते असे राजेंद्र छाजेड यांनी सांगितले. निसर्गाने घडविलेल्या अनेक वस्तूंचे सौंदर्य, आकार, रंग, व्यक्तींचे भाव पाहण्याचे सामर्थ्य डोळ्यांत आहे. मात्र डोळे नसलेले अनेकजण आहेत. मृत्यूनंतर डोळे मातीमोल होऊ देण्यापेक्षा नेत्रदान करून अनेकांना जग पाहण्याची संधी उपलब्ध होऊ शकते असे आ.उन्मेश पाटील यांनी विशद केले. नेत्रदानासाठी विविध उपक्रम राबविले जातात. नेत्रदानासाठी प्रचार आणि अंमलबजावणीची गरज असल्याचे मिनाक्षी निकम यांनी सांगितले. मागील १९ वर्षात ४४८ नेत्रदानाच्या माध्यमातून २२० दृष्टिहीनांना दृष्टी प्राप्त झाली आहे तर अनेक गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला असल्याचे सचिन चोरडिया यांनी सांगितले यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, लक्ष्मीकांत पाठक, भारती चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.


नेत्रचेतना यात्रा यशस्वी करण्यासाठी चाळीसगाव शहरातील स्वयंदीप फाऊंडेशन, युगंधरा फाऊंडेशन, जिजाऊ समिती, रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी, गुरुकुल ट्रस्ट व ग्रंथालय भारती (देवगिरी प्रांत), आई फाऊंडेशन, उमंग महिला शिल्पी, रंगगंध कलासक्त न्यास, भारत विकास परिषद, चाळीसगाव तालुका मेडिसिन डीलर असोसिएशन, आय.एम.ए, इनरव्हील क्लब, रोरॅक्ट क्लब, रोटरी क्लब ऑफ संगम, रोटरी क्लब ऑफ मिलेनियम, मारवाडी युवा मंच, संस्कार भारती, महाराष्ट्र वाणी युवा मंच इत्यादी संस्थाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
@@AUTHORINFO_V1@@