मुरबाड : शहरात काही ठिकाणी पुर्वी पासुन पत्रव्यवहार करण्यासाठी टपाल पेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र नविन तंत्रज्ञान व टेक्नॉलॉजीमुळे पत्र पाठवुन विचारपुस करण्याची आवश्यकता भासत नसल्याने ह्या टपाल पेट्या इतिहास जमा होत खितपत पडल्याचे दिसत आहे.व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर, या सोशल मीडियाच्या साधनामुळे थेट संपर्क करता येत असताना या टपाल पेट्या फक्त पोस्टातुन येणार्या पत्रा प्रमाणे टपालपेटीत काही पत्र येतील का याचीवाट पाहताना दिसत आहेत. मुरबाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व पोलिस ठाण्याच्या लगत अनेक वर्ष एक टपाल पेटी होती. तेथे तीन वर्षा पुर्वी टपाल पेटी नव्याने बसविण्यात आली. मात्र या टपालपेटीत कुठलेही टपाल येत नसल्याने हि टपाल पेटी फक्त दिखाव्यासाठी ऊभी असुन पोस्ट खात्याने या टपाल पेट्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत