बारामुल्ला : दहशतवादी व सुरक्षा रक्षकांत चकमक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील राफियाबाद येथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात सध्या चकमक सुरु आहे. या भागात सध्या सुरक्षा रक्षकांकडून घेराव घालण्यात आला आहे. काल उत्तर काश्मीरमधील गुरेज परिसरात झालेल्या चकमकीत ४ जवान शहीद झाले होते. तर याच चकमकीत ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले होते. गुरेझ येथील लाइन ऑफ कंट्रोल जवळ पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी भारतीय जवानांनी हटकल्यानंतर दहशदवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. 
 
 
 
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये असलेल्या एसबीआयच्या शाखेजवळ देखील दहशतवाद्यांकडून ग्रेनेट हल्ला करण्यात आला होता. तसेच डीसी कार्यालयाजवळ देखील गोळीबार करण्यात आला. हा हल्ला  सकाळी अचानक झाल्याने आसपासच्या परिसरात शांतता पसरली तसेच सगळ्या जवळच्या भागामध्ये सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.   
 
 
@@AUTHORINFO_V1@@