माऊलींची पालखी आळंदीत दाखल, वारी सोहळा पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |
 

 
 
आळंदी : गेले ३२ दिवस सुरु असलेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज अखेर आळंदी मुक्कमी पोहोचली आहे. ६ जुलै रोजी सुरु झालेला पालखीचा प्रवास आज अलंकापुरीत येऊन पूर्ण झाला. २७ जुलै रोजी गुरुपौर्णिमा व पांडुरंग रुक्मिणी पूजन झाल्यावर २८ जुलै रोजी पालखीने परतवारी सुरु केली व अखेर आज माऊलींची पालखी आळंदीत पोहोचली.
 
 
"पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ। घरा आले घरा आले घरा आले कृपाळू ।।" या जयघोषाच्या गजरात वारकऱ्यांनी आळंदीत प्रवेश केला व वारी पूर्ण झाल्याचा आनंद लुटला. ज्येष्ठ वद्य अष्टमीला निघालेली पालखी आज अखेर आषाढ वद्य दशमीला आळंदी मुक्कामी सुखरूप परत आली. मात्र यावेळी माऊलींच्या पालखीसोबत निघालेला अश्व तेवढा परत आला नाही. उद्या आषाढ वद्य एकादशीच्या दिवशी वारीची अधिकृतरित्या सांगता होणार आहे. 
 
 
पंढरपूरहून निघालेली पालखी येताना अधिक अंतर एका दिवसात कापत येते. त्यामुळे २८ जुलै रोजी निघालेली पालखी वाखरी, वेळापूर, नातेपुते, फलटण, घाडेगाव, वाल्हे, हडपसर, सासवड, पुणे मार्गे ५ ऑगस्टलाच पुण्यात दाखल झाली. गेले दोन दिवस पालखीचा मुक्काम पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात होता. आज सकाळी पालखीने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. उद्या श्री माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा आहे त्यानंतर मारुती मंदिर हजेरी होऊन पालखी सोहळा पूर्ण होणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@