सुरक्षा रक्षकांना मोठे यश, पाच दहशतवादी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान भागात आज सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. या भागात आज सुरक्षा रक्षकांनी तब्बल पाच दहशतवाद्यांना ठार केले आहे. आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा करत आपली कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविली आहे. या पाच दहशतवाद्यांकडून अनेक शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत. 
 
 
एके-४७, दारुगोळा, बंदुकीच्या गोळ्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. अजून देखील या भागात शोध मोहीम सुरु आहे. शोपियानमधील किल्लोरा भागात ही चकमक सुरु आहे. काल देखील जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये असलेल्या एसबीआयच्या शाखेजवळ दहशतवाद्यांकडून ग्रेनेट हल्ला करण्यात आला आहे. तसेच डीसी कार्यालयाजवळ देखील गोळीबार करण्यात आला. 
 
 
काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले असल्याने त्याचा बदल म्हणून हा हल्ला करण्यात आला असे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या आसपासच्या परिसरात अलर्ट घोषित करण्यात आला असून लोकांना घराबाहेर येण्यास मनाई करण्यात आली आहे. 
 
 
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे काल सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना मारले होते. सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत झालेल्या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा रक्षकांनी या दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यामुळे सध्या सगळ्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आहे. 
@@AUTHORINFO_V1@@