खलिस्तानी दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा नापाक प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2018   
Total Views |


 

आपल्या दोन्ही देशांच्या संबंधांचा विचार करून इंग्लंडने अशी प्रकरणे हाताळावीत. याच्या आधीच भारताने इंग्लंडकडे पत्राद्वारे आणि दोन बैठकांमध्ये हा मुद्दा उपस्थित करून निदर्शनांना परवानगी देऊ नये, अशी विनंती केली होती. लंडनला निरोप देण्याची गरज आहे की, जर तुम्ही एका पाकिस्तानी मूळ नागरिकांमुळे जर भारतविरोधी तत्त्वांना समर्थन देणार असाल, तर आम्हाला मान्य नाही. यामुळे भारत आणि ब्रिटन यांचे संबंध खराब होऊ शकतात.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

१२ ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रॅफेलगार स्क्वेअर येथे खलिस्तानवाद्यांच्या एकत्र येण्याला भारताने कडाडून विरोध केला होता. भारताने हा प्रस्तावित मोर्चा होऊ नये अशी मागणीही इंग्लंडकडे केली होती. मात्र, इंग्लडने तसे करण्यास नकार दिला. यावर भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली. हा मोर्चा म्हणजे भारताच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका पोहोचेल, असे फुटीरतावाद्यांनी केलेले कृत्य आहे अशा शब्दांमध्ये भारताने म्हटले आहे. हे प्रकरण पुन्हा इंग्लंड सरकारकडे लेखी प्रत्यक्ष भेटून मांडण्यात येईल. ही निदर्शने हिंसा आणि द्वेषाला खतपाणी देण्यासाठी होणार असल्याचेही भारताने म्हटले आहे.

 

पाकिस्तानी मुळाचे लंडनचे महापौर सादिक खान यांनी खालिस्तान संमेलन (रॅली) ट्रॅफेलगार उपनगरात भरवण्याची परवानगी दिली. मात्र, त्याच दिवशी ते वाजण्याच्यामध्ये भारताच्या बाजूने असलेल्या संमेलनाला मात्र परवानगी नाकारली. कारण सांगण्यात आले की, त्यांनी ही परवानगी वेळेवर मागितली नव्हती. खलिस्तानसाठी मेळावालंडन डिक्लेरेशननावाने ओळखला जातो आणि अमेरिकेतीलसीख फॉर जस्टिसया संस्थेने तो आयोजित केला होता. या बैठकीचा मुख्य उद्देश होता की, २०२० मध्ये जगभर सार्वमत घेतले जावे आणि भारतातील पंजाबला स्वातंत्र्य मिळावे. या सार्वमतामध्ये तीन कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असेसीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे. भारतातील शीखांनाही यामध्ये सहभाग घेता येईल, असे या संघटनेने म्हटले आहे. भारत जगातील वीस शहरांमध्ये सार्वमत घ्यावे आणि ५० लाख मतांचा त्याला पाठिंबा मिळवावा, अशी धडपड सुरू आहे. नंतर त्याचा निकाल युनोत पाठवण्यात येणार आहे.

 

महापौर सादिक खान महत्त्वाचे आहेत की भारत-ब्रिटन संबंध?

लंडनस्थित भारतीयांनी खालिस्तान संमेलनाविरुद्धआम्ही भारतीयम्हणून एक संस्था सहा महिन्यांपूर्वी उभारली. त्यांनी ठरवले की, १५ ऑगस्टच्या निमित्ताने ते भारताचा स्वातंत्र्य दिन लंडनमध्ये साजरा करतील. मात्र, या बैठकीला लंडनचे महापौर मूळचे पाकिस्तानी सादिक खान यांनी परवानगी दिली नाही. त्यांच्या या कारवाईला भारत विरोधी मानले जाते.

आपल्या दोन्ही देशांच्या संबंधांचा विचार करून इंग्लंडने अशी प्रकरणे हाताळावीत. याच्या आधीच भारताने इंग्लंडकडे पत्राद्वारे आणि दोन बैठकांमध्ये हा मुद्दा उपस्थित करून निदर्शनांना परवानगी देऊ नये, अशी विनंती केली होती. लंडनला निरोप देण्याची गरज आहे की, जर तुम्ही एका पाकिस्तानी मूळ नागरिकांमुळे जर भारतविरोधी तत्त्वांना समर्थन देणार असाल, तर आम्हाला मान्य नाही. यामुळे भारत आणि ब्रिटन यांचे संबंध खराब होऊ शकतात. लक्षात ठेवा की, आम्ही पण ब्रिटन विरोधी कारवायांना भारतात प्रसिद्धी देऊ शकतो. हे आपल्याला आवडेल का? फैसला करा की, ‘तुम्हाला लंडनचे महापौर सादिक खान महत्त्वाचे आहेत की भारत-ब्रिटन संबंध?’

 

पाकिस्तानी अधिकारी युरोपातील खलिस्तानवादी आंदोलनाचा सूत्रधार

स्वतंत्र खालिस्तानच्या मागणीसाठी कॅनडा आणि युरोपात सुरू असलेल्यारेफरेंडम २०२०या मोहिमेचा सूत्रधार एक पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानी सैन्यातीलचौधरी साहबअर्थात लेफ्टनंट कर्नल शाहिद मोहम्मद मलही हा अधिकारी युरोपात नव्याने सुरू झालेल्या खलिस्तानवाद्यांच्या भारतविरोधी आंदोलनाचा सूत्रधार आहे. चौधरीच्या वैयक्तिक संगणकामधून अनेक दस्तऐवज आढळून आले आहेत. ज्यामध्येरेफरेंडम २०२०चळवळीचा विस्तृत आराखडा सापडला आहे. या मोहिमेच्या मागे अमेरिकेतीलसीख फॉर जस्टिसही संस्था मुखवटा आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणाआयएसआयया मागणीची मुख्य सूत्रधार आहे. ‘आयएसआयपाकिस्तानसह जगातील इतर काही ठिकाणच्या मुखवटा संघटनांसोबत काम करीत आहे.

 

गेल्या दोन वर्षांमध्ये पंजाबमध्ये झालेल्या हिंदू नेत्यांच्या हत्यांमध्येही या चौधरीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ‘आयएसआयने युरोपात सुरू असलेल्यारेफरेंडम २०२०लाऑपरेशन एक्स्प्रेसअसे नाव देण्यात आले आहे. जून, २०२० मध्ये हेरेफरेंडम २०२०सुरू करण्यात येणार आहे. याच दिवशी पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राबवलेल्याऑपरेशन ब्लू स्टारया मोहिमेला 35 वर्षे पूर्ण होत आहेत. खलिस्तानवाद्यांना पाकिस्तानातील अनेक संस्थांकडून आर्थिक मदत मिळत आहे.

 

१९८० -१९९० च्या दशकातील खलिस्तानची चळवळ भारतातून नष्ट करण्यात आली असली तरी इंग्लंड, कॅनडासारख्या देशांमध्ये काही मोजक्या लोकांनी खलिस्तान प्रश्नाचा निखारा धगधगत ठेवला आहे. यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या परस्परसंबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे.

 

दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न

अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर जगातील सर्वच राष्ट्रांनी दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उलचण्यास प्रारंभ केला. त्यानंतर या खलिस्तानवाद्यांनी आपला पवित्रा बदलून स्वतंत्र राज्याची उघड मागणी करण्याचे बाजूला ठेवले. त्याऐवजी ते शीखांवर होणारा अन्याय आणि अल्पसंख्याकांचे अधिकार याबद्दल बोलू लागले. त्यात पंजाबातील बेरोजगारी आणि ड्रगमाफियांचा उदय या समस्यांनी गेली दहा वर्षे थैमान घातले आहे. याचा फायदा घेऊन पाकिस्तान-पंजाबमध्ये दहशतवाद पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

काश्मीर फुटीरतावाद्यांचा खलिस्तानला पाठिंबा

पाश्चात्य देशातील राजकारण्यांना खलिस्तान काय आहे? हे माहीत आहे. पंजाब हे काश्मीरच्या शेजारचे राज्य आहे आणि स्वतंत्र काश्मीरला सक्रीय पाठिंबा देणारा खलिद आवान हा पकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिकखलिस्तान कमांडो फोर्सला शस्त्रपुरवठा केल्याचा आरोप सिद्ध होऊन अमेरिकेतील तुरुंगात १४ वर्षांची सजा भोगत आहे. तरीही तेथील सरकारे खलिस्तानवादी लोकांच्या नियोजित सभेला अटकाव करण्याच्या भारताच्या विनंतीचा विचार करत नाहीत.

 

पंजाब स्वतंत्र झाल्यास स्वतंत्र काश्मीर निर्माण करणे सोपे जाईल, अशी अटकळ बांधून काश्मीर फुटीरतावादी खलिस्तानला पाठिंबा देत आहेत. ज्यावेळेस खलिस्तान दहशतवाद चळवळ भारतात सुरू झाली, त्यावेळी एक प्रमुख नेते समर्थक कट्टवादी जगजीतसिंह हे कॅनडात राहत होते अनिवासी भारतीय होते. कॅनडामध्ये एका भारतीय मंत्र्याचा खून करण्यात आला आणि आपले एक विमानही पाडले होते. भारतविरोधी दहशतवादी देशाबाहेरही कटकारस्थाने करू शकतात. अशा प्रकारचे प्रयत्न अनेक देशात होत आहेत. त्यावर भारताला लक्ष देऊन परदेशात त्यांच्या कारवाया कशा रोखायच्या, हे एक आव्हान आहे.

 

खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले यांचे उद्दातीकरण पंजाबमधील काही संस्थांकडून करण्यात येत आहेत. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी त्याकरिता पोस्टर लावली गेली. या कागदपत्रांमध्ये पंजाब पोलिसांना आवाहन करण्यात आले होते की, त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळू नये. या पत्रकातून त्यांना बंड करण्यास सांगत होते. खलिस्तानवाद्यांचे साहित्य, फोटो गुरूद्वाराबाहेर विक्रीला ठेवण्यात येते. मात्र, अशा प्रकारे त्यांचा फोटो दरबार साहिबामध्ये लावण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदाच होतो आहे. त्यांचे उद्दात्तीकरण करून आणि खलिस्तानविषयी तरुणांना भडकावून खलिस्तानी दहशतवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय शीख हे देशप्रेमी आहे. पण, काही वाट चुकलेल्या शीखांच्या संघटना अमेरिका, युरोप आणि कॅनडामध्ये तयार होत आहेत.

 

भारतविरोधाचा बीमोड कसा करावा?

खोटी माहिती सर्वदूर पसरवून शीखांवर भारतात अन्याय होत असल्याची बातमी पसरवली जाते. या सर्वच घटनांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कॅनडात होणार्या भारतविरोधी खलिस्तानी कारवायांवर लक्ष ठेवून त्याला विरोध व्हायला हवा. दुसर्या देशामध्ये भारतविरोधी कारवाया करणार्यांविरोधात कारवाई अनेक स्तरांवर करावी लागेल. इस्रायलचे गुप्तहेर खाते देशाच्या शत्रूंना इतर देशांत जाऊन पकडते, तसे आपण करू शकतो का? मुत्सद्देगिरीच्या जोरावर अशा देशांना भारतविरोधी कारवायांवर लक्ष ठेवून त्या त्या देशातील कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. आमच्यावर अन्याय होतो, म्हणून जो दु:प्रचार केला जातो त्याविरोधात त्या देशातील स्थानिक माध्यमांतून लिहून हा विरोध मोडून काढण्याची गरज आहे. खलिस्तान समर्थकांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. भारतविरोधी कारवाया या परदेशी भूमीवर होत असताना त्यावर लक्ष ठेवून त्यावर हल्ला प्रतिहल्ला करणे गरजेचे आहे. भारत सरकार परदेशातील भारतविरोधी कारवाया थांबवण्याचा प्रयत्न करेल का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 


@@AUTHORINFO_V1@@