व्यापारवृद्धीसाठी ब्रिस्बेनची विमानसेवा पुन्हा सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

 ब्रिस्बेनची खंडित झालेली विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करणार

 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. ५० टक्के परदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात येणार आहे. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्रातील पर्यटन आणि व्यापार वाढीसाठी खंडित झालेली ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
ऑस्ट्रेलियाच्या भारतातील उच्चायुक्त हरिंदर सिद्धू यांच्या शिष्टमंडळाने आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली; त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत टोनी ह्यूबर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव सतीश जोंधळे आदी उपस्थित होते.
 
 
मुख्यमंत्री म्हणाले, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात चांगले वातावरण असून पायाभूत सोयी-सुविधाही आहेत. राज्यात काही ठिकाणी पर्जन्यछायेखालील क्षेत्र आहे, यावर जलसंधारणाच्या माध्यमातून काम सुरू आहे. या क्षेत्रात ऑस्ट्रेलियाच्या गुंतवणूकदारांना काम करण्यास खूप संधी आहेत. गोदावरी नदी खोऱ्याचे काम हे ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या सामंजस्य करारातून होत आहे. मराठवाड्यात वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी टंचाई दूर करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. महाराष्ट्रात ५० टक्के धरणांचे काम सुरू आहे, यात ऑस्ट्रेलियाने योगदान द्यावे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@