केरळमधील पूरग्रस्तांसाठी जैन उद्योग समूहाचा मदतीचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

दीड कोटीचे मसाले आणि फळयुक्त आहाराचे कंटेनर रवाना

 
 
जळगाव :
देवभूमी केरळमध्ये वादळी पावसामुळे निम्म्याहून अधिक राज्याची मोठी हानी झाली असून लाखो लोकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची वानवा निर्माण झाली आहे. केरळमधील नागरिकांना मदतीसाठी मानवतावादीदृष्टिने दीड कोटीचे मसाले आणि फळयुक्त आहाराचे कंटेनर जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने रवाना केले आहे.
 
 
जैन इरिगेशनच्या जैन फार्मफ्रेश फूडस् लि.आणि भवरलाल ऍन्ड कांताबाई जैन फाउंडेशनद्वारे दीड कोटी मूल्याचे निर्जलिकृत कांदे, मसाले व फ्रुट टु गो हा फळयुक्त आहार असे एक लाख किलो खाद्यपदार्थ पाठवले जाणार आहे. बुधवारी रात्री एर्नाकुलमला जाणार्‍या मंगला एक्स्प्रेसमधून २० हजार किलो मसाले भरलेली एक वॅगन पाठवण्यात आली. २२ हजार किलो निर्जलिकृत कांदे भरलेली दुसरी वॅगन गुरूवारी पाठवण्यात येईल. त्यानंतर आणखी ३ वॅगन्स भरून खाद्यपदार्थ पाठविले जातील. हे साहित्य पाठविण्यासाठी रेल्वे विभागाने ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. केरळमधील पूरग्रस्तांना वॅगन पाठवण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जैन फार्मफ्रेश फूडस् लि.चे सहकारी तसेच रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.
@@AUTHORINFO_V1@@