‘भारतरत्न’ अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील पितामह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |



 
 
देशभक्ती, हजरजबाबीपणा, विनम्रता, वाक्चातुर्य आणि आपल्या वाणीने करोडो देशवासीयांबरोबरच विरोधकांच्याही हृदयसिंहासनावर राज्य करणारे अतुलनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताच्या राजकारणातील पितामह अटल बिहारी वाजपेयी, असे म्हटले तर ते निश्चितच अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. तीनवेळा देशाच्या सर्वोच्च अशा पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतरही त्यांचे पाय सतत जमिनीवरच राहिले आणि यातच त्यांचा खरा मोठेपणा दिसून येतो.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

दि. २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तेव्हा मोठे होऊन ते देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील, असे कुणालाही वाटले नव्हते. परंतु, आपल्या कर्तबगारी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे पद भूषवून संपूर्ण विश्वात त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला. त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे शिक्षक होते. शिक्षणात अटलजींना त्यांचाच खरा वारसा लाभला. अटलजींनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये बी..ची पदवी मिळवली. नंतर कानपूर येथे त्यांनीराज्यशास्त्रया विषयात एम.. केले. शालेय जीवनापासूनच ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. हिंदीवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात त्यांनी अनेक दैनिकांत संपादनाचे कामही केले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९५१ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली, तेव्हापासून वाजपेयी या पक्षाशी निगडित आहेत. मुखर्जींचे कट्टर अनुयायी म्हणून ते गणले जात. राजकारणाचे बाळकडू त्यांना खर्या अर्थाने येथूनच मिळाले आणि त्यांनी नंतर कधी मागे वळून बघितलेच नाही. १९५७ मध्ये प्रथम त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली आणि ते जिंकले. त्यांनी आपल्या वाणीने आणि प्रभावी वक्तृत्वाने संसद गाजवून आपली निवड सार्थ ठरविली. यानंतर २००४ पर्यंत म्हणजे पाच दशकांहून अधिक काळ संसदेचे म्हणजे दहावेळा लोकसभा, तर दोनवेळा राज्यसभेचे सदस्यत्व भूषवून दीर्घकाळ संसदपटू होण्याचा बहुमानही मिळवला. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांच्यावर एकही आरोप झाला नाही, यावरूनच त्यांच्या महानतेची साक्ष पटते.

 
 

1968 मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनानंतर त्यांच्यावर जनसंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली, तेव्हा त्यांनी नानाजी देशमुख, बलराज मधोक आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या मदतीने जनसंघाच्या बळकटीसाठी महत्त्वाचे योगदान दिले. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाला. १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्षाचे सरकार मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले, तेव्हा वाजपेयी यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार खात्याची जबाबदारी आली आणि त्यांनी या पदास पुरेपूर न्याय दिला. आपापसातील कलहामुळे देसाई सरकार पडले आणि जनता पक्षही फुटला. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा पहिला बहुमान वाजपेयींनाच मिळाला. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना धक्का बसला. भाजपचेही फक्त दोन सदस्य निवडून आले होते. परंतु, त्याने खचून जाता वाजपेयी आणि त्यांच्या सहकार्यांनी जोमाने पक्षबांधणी केली आणि १९८९ च्या निवडणुकीत या पक्षाने ८८ तर यानंतर १९९१ च्या निवडणुकीत १२० जागा जिंकण्याचा करिष्मा करून दाखविला. वाजपेयींच्या संघटन कौशल्याची त्यामुळे वारेमाप तारीफ झाली. १९९१ मध्ये भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला. त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच १९९३ ते १९९५ पर्यंत त्यांना संसदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी संसद गाजवूनउत्कृष्ट संसदपटूहा किताबही पटकावला. त्यामुळेच १९९६च्या निवडणुकांआधी भाजपतर्फे त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते.

 
 

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप जास्त जागा जिंकणारा मोठा पक्ष ठरला होता. वाजपेयींचा पंतप्रधान म्हणून शपथविधीही झाला परंतु, सभागृहात बहुमत सिद्ध करता आल्याने १३ दिवसांतच वाजपेयींना राजीनामा देणे भाग पडले होते. १९९८ च्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले आणि हे सरकार १३ महिने टिकले. परंतु, सत्तेवर आल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच पोखरण येथे अणुचाचणी घेऊन आपल्या देशाच्या क्षमतेची खरी ओळख त्यांनी संपूर्ण विश्वाला करून दिली होती. १९९९ च्या मे ते जुलै दरम्यान कारगिल युद्ध झाले. यावेळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी बळकाविलेला भारताचा भूभाग भारतीय सैन्याने परत मिळविला आणि वाजपेयींच्या नेतृत्वाची खूपच प्रशंसा झाली. त्यांची लोकप्रियताही वाढली. याचा फायदा त्यांना १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत झाला. या निवडणुकीनंतर वाजपेयी तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. या काळात त्यांनी आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भरीव सुधारणा घडवून आणल्या. ‘राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पआणिपंतप्रधान ग्रामसडक योजनाहे त्यांचे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प. २००० मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन यांनी भारतास भेट दिली, त्यावेळी उभय देशांतील आर्थिक आणि औद्योगिक संबंध अधिक बळकट झाले होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित सरकार सत्तेवर आले. यानंतर काही काळाने वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि २००९ ची निवडणूकही त्यांनी लढवली नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. यानंतर झालेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली. आज देशभरात भाजपची हवा असली तरी यात वाजपेयी आणि भाजपला मोठे करणार्या नेते आणि कार्यकर्त्यांचे योगदान विसरून चालणार नाही. उत्कृष्ट संसदपटूबरोबरच ते उत्कृष्ट साहित्यिक आणि कवीही होते. संसदेत ते विरोधकांना आपल्या खास शैलीत कोपरखळ्या मारून सभागृह सतत हर्षोल्हासित ठेवत. सभागृहात सर्व त्यांचा आदर बाळगीत. त्यांचे सभागृहातील अस्तित्व तरुण खासदारांसाठी प्रेरणादायी ठरत असे. ‘भारतरत्न’, ‘पद्मविभूषणआणिउत्कृष्ट संसदपटूआदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते इस्पितळात उपचार घेत होते. ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि आचार सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील, यात शंका नाही. त्यांना विनम्र अभिवादन!

अरुण शेंदुर्णीकर

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@