भातसा धरण ओव्हरफ्लो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |


मुंबईकरांचा पाणीप्रश्‍न सुटला

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

शहापूर: मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा,वैतरणापाठोपाठ भातसा धरणाचे पाचही दरवाजे 0.२५ मीटरने उघडण्यात आले. या धरणातून सध्या ४ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे भातसा धरणाचे द्वार विभागाचे उपअभियंता रवि पवार यांनी सांगितले. तीन ते चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मात्र गेले दोन दिवस कहर केला असून धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. १५ दिवसांपूर्वी तानसा व वैतरणा धरण तुडुंब भरले असताना भातसा धरणाच्या पातळीतही कमालीची वाढ होत होती. त्यातच पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक लक्षात घेता धरणाचे ३ दरवाजे 0.२५ मीटरने उघडण्यात आले होते. मात्र पाण्याची आवक लक्षात घेऊन सोमवारी सायंकाळी या धरणाचे पाचही दरवाजे ० .२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. मंगळवारी धरणाच्या पाण्याची पातळी १४० .५ मीटर इतकी असून, धरण भरून वाहण्याची पातळी १४१ मीटर इतकी आहे.

 

सध्या धरण काठोकाठ भरले असून पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन धरणाचे पाचही गेट ० .२५ मीटरने उघडण्यात आले असल्याचे धरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून ४ हजार क्सुसेस इतका पाण्याचा प्रवाह सुरू आहे. भातसा धरण भरून वाहू लागल्याने मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट कायमस्वरूपी मिटला आहे.

 

भातसा धरण वाहून लागल्याने भातसा नदीच्या पात्रातही पाण्याची पातळी वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन धरणाखाली शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील तहसील कार्यालयांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत तर नदीकाठच्या साजिवली, सावरशेत, खुटाडी, अर्जुनली, सापगांव, सरलांबे आवरे, हिव, अंदाड, कांबारे, खुटघर, भातसई, वासिंद, शहापूर आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@