राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्‌भावना दिवस साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुख्यमंत्र्यांनी दिली सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा
 

मुंबई : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना ‘सद्‌भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.
 
 
यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव डी. के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मलिक, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीकांत सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, वनविभागाचे सचिव विकास खारगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
 
जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी उपस्थितांना दिली.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@