नवी दिल्ली : भारतीय राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे अटल बिहारी वाजपेयी आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. एम्सने जाहीर केलेल्या आरोग्य अहवालात हे सांगण्यात आले असून आता अटल बिहारी वाजपेयी आपल्यात नसल्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दुख: व्यक्त केले जात आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, गृह मंत्री राजनाथसिंह यांनी सगळ्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सगळे मनाने दुखी: झाले असून लोकांना आणि राजकारणातील नेत्यांना ही दुखःद बातमी ऐकल्यावर मन सुन्न झाले आहे.
आज संपूर्ण भारत शोककळेत गेला असून सगळ्यांच्या तोंडावर, सोशल मिडियावर अटल बिहारी यांच्या कविता रेंगाळत आहे. राजकारणात एकही शत्रू नसणे सामाजिक कार्य आणि त्यांचे हिम्मत देणारे भाषणं यामुळे युवकांनी प्रेरणा घेतली असून राजकारणातील नेत्यांनी त्यांना राजकारणाचा अजातशत्रू मानले आहे. अशा आपल्या लाडक्या नेत्याला गमावले असे ऐकताच देश संपूर्ण दुख:त गेला आहे.