पालिकेच्या पुरस्कारांसाठी लागणार ‘वशिला’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |



ठाणे : महापालिकेच्यावर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिवशी पालिकेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. यासाठी पालिकेने ठाणे भूषण, गौरव आणि गुणीजन यांसारख्या पुरस्कारांची सुरुवात केली. मात्र यावर्षी पालिकेने अजब अट घातली आहे. या पुरस्कारांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची शिफारस बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे आता पालिकेच्या पुरस्कारासाठी गुणीजनांना नगरसेवक, आमदार किंवा खासदार यांचा वशिला नसेल तर या पुरस्कारासाठी ते पात्र ठरणार नाहीत. या पुरस्कारांसाठीच्या निवडीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा आधीपासूनच होत होत्या.

 

त्यानंतर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच यासंबंधी ठोस नियमावली आखण्याच्या सूचना केल्या होत्या. ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन दरवर्षी ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या पुरस्काराची निवड प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून अनेकदा वादाचा मुद्दा ठरला आहे. पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तीबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर पालिकेला त्यांचे नाव वगळावे लागल्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुरस्काराची निवड करण्यासाठी नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या नियमावलीनुसार अर्जदारांना राजकीय शिफारस बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व पुरस्कारांसाठी महापौरांचा निर्णय अंतिम असेल, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेची ही अजब अट वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

@@AUTHORINFO_V1@@