आर्थिक अडचणींमुळे त्यांना उपचारासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, त्यावेळी त्यांचे नाव चर्चेत आले होते. तसेच देशासाठी महत्वाची कामगिरी करुन देखील त्यांना अशा परिस्थितीला का सामोरे जावे लागत आहे, असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होते.
हकम सिंह यांनी देशासाठी नेहमीच मोठी कामगिरी केली आहे. ते भारतीय सेनेत देखील दाखल झाले होते. ते १९७२ मध्ये ६ सिख रेजीमेंट मध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. २९ ऑगस्ट २००८ रोजी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.