श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील तंगधार येथील नियंत्रण रेषेवर सोमवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला आहे.
भारतीय नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेक वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिनी पाकिस्तानी सैन्याचे दोन सैनिक ठार करून भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. ‘पाकिस्तानकडून वारंवार होणारी शस्त्रसंधी रोखण्यासाठी तसेच घुसखोरी थांबवण्यासाठी भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे.’ अशी माहिती भारतीय संरक्षण प्रवक्त्यांनी दिली आहे.