राहूल गांधी यांनी करोडो हिंदूंच्या भावनांचा अपमान केला : डॉ. संबित पात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |

राहूल गांधी हे तर तात्पुरते जानवे धारण केलेले इच्छाधारी हिंदू : डॉ. पात्रा


 
 
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्याला जहाल व मवाळ यापैकी कोणतेही हिंदुत्व मान्य नसल्याचे सांगत देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा अपमान केला आहे असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. संबित पात्रा यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष यांनी आज हैद्राबाद येथे काही संपादकांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांना विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी हे विधान केल्याचा आरोप पात्रा यांनी केला. नवी दिल्ली येथे आज यासंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
 
 
 
काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीर येथे मुस्लिम बुद्धिवंतांच्या एका एकत्रिकरणात राहूल गांधी यांनी काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष आहे व मी मंदिरात गेलो ही माझी चूक झाली असे विधान केले होते. त्याची बातमी देखील माध्यमांमध्ये छापून आली होती. त्यानंतर काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाचे प्रमुख नदीम जावेद यांनी देखील गांधी यांच्या या विधानाची पुष्टी केली होती अशी आठवण पात्रा यांनी करुन दिली. तसेच आता आपल्या कोणत्याही हिंदुत्वावर विश्वास नाही असे विधान गांधी यांनी केले आहे. त्यामुळे हा देशातील बहुसंख्य जनतेचा अपमान आहे अशी टीका पात्रा यांनी यावेळी केली तसेच हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
राहूल गांधी यांचे जानवे केवळ देखाव्यासाठी :

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळी राहूल गांधी यांनी द्वारकाधीश मंदिरातील नोंदवहीत आपली नोंद वेगळी केल्यामुळे झालेल्या गदारोळाची आठवण पात्रा यांनी यावेळी करुन दिली. त्यावेळी त्यांच्या प्रवक्त्याने ताबडतोब बाजू सावरत राहूल गांधी हे साधारण हिंदू नाहीत तर जनेऊधारी अर्थात जानवे धारण केलेले हिंदू आहेत. मात्र आता लक्षात येत आहे की राहूल गांधी यांचे जानवे हे तात्पुरत्या स्वरुपाचे जानवे होते अशी खरमरीत टीका पात्रा यांनी केली. तसेच आपण शिवभक्त असल्याचा कांगावा गांधी यांनी केला होता. मात्र आज आपला हिंदू तत्त्वज्ञानावर विश्वासच नसल्याचे सांगून राहूल गांधी यांनी देशातील हिंदूचा अपमान केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
 
 
राहूल गांधी हे तुष्टिकरणाचे राजकारण करत असून ते इच्छाधारी हिंदू बनले आहेत. जिथे आपला फायदा आहे तिथे ते आपल्या इच्छेने हिंदू असतात आणि जिथे अडचणीचे असते तिथे ते ताबडतोब आपले जानवे काढून ठेवतात, शिवशंकराला विसरतात आणि म्हणतात माझा हिंदुत्वावर विश्वासच नाही. देशातील करोडो लोकांच्या श्रद्धांशी राहूल गांधी खेळ खेळत आहेत असा आपोरही पात्रा यांनी केला. जर राहूल गांधी यांना हिदुत्वावर विश्वासच नाही तर मग मंदिरात जाणे, जानवे धारण करणे, शिवाची उपासना करणे ही सोगं घ्यायचे कारणच काय असा सवालही पात्रा यांनी यावेळी उपस्थित केला.
 
 
डॉ. संबित पात्रा यांचे पत्रकार परिषदेतील संपूर्ण भाषण : 
 
 
@@AUTHORINFO_V1@@