शहांच्या रॅलीनंतर प.बंगालमध्ये टीएमसीच्या गुंडांचा हैदोस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |

भाजप कार्यालयाची तोडफोड; कार्यकर्त्यांना देखील मारहाण




कोलकत्ता : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी बंगालमधील भाजप कार्यालयांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तसेच कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अमित शहांच्या रॅलीमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे तृणमूलच्या गुंडांनी हे कृत्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच या सर्व गुंडांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी देखील भाजपने केली आहे.


राज्याच्या दक्षिण भागामध्ये असलेल्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये तृणमूलच्या गुंडांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून काही ठिकाणी सौम्य तीव्रतेचे स्फोट देखील घडवून आणले आहेत. दक्षिण २४ परगणामधील डायमंड हार्बर, नोदाखाली, विष्णुपुर व फलता याठिकाणी असलेल्या भाजप कार्यालयांवर तृणमूलच्या गुंडांनी हल्ला केला व याठिकाणी असलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले. कार्यालयाच्या काचा, खुर्च्या आणि इतर वस्तूंची देखील तोडफोड करत काही ठिकाणी आग देखील लावण्यात आली. तसेच स्फोट घडवून आणण्यात आले. यामुळे कार्यलयाच्या आजूबाजूला राहत असलेल्या नागरिकांच्या मनात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






दरम्यान या घटनेनंतर भारतीय जनता पक्ष कमालीचा आक्रमक झाला असून तृणमूलच्या गुंडांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तृणमूल पक्ष अगोदर फक्त भारतीय जनता पक्षा घाबरत होता, परंतु आता मात्र तो बंगालमधील नागरिकांना देखील घाबरत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठीच हे सर्व प्रयत्न करत आहे, असा टोला भाजपने लगावला आहे.
@@AUTHORINFO_V1@@