राहुल गांधी गोंधळल्यामुळेच खोटं बोलतात : प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे गोंधळले असल्याने जनतेपुढे चक्क खोटं बोलतात असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी आज हे मत व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांना काय बोलावे हे सुचत नसल्याने ते जनतेपुढे काहीही बोलतात असे म्हणत रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधी हे खोटं बोलण्याची पराकाष्ठा करीत आहेत असे आरोप लावले आहेत. 
 
 
 
 
 
 
आपल्या खोटं बोलण्यामुळे राहुल गांधी हे देशाचे भवितव्य अंधारात ढकलत असून ते देशाचे हित धुळीस मिळवत आहे असेही ते यावेळी म्हणाले. राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काहीही बोलतात हे बोलण्याचा त्यांना हक्क नाही. विरोधी पक्ष नेते सरकारचे काय चुकते हे निदर्शनास आणून देत असतो मात्र येथे एखाद्या व्यक्तीला नेम केले जाते हे चुकीचे आहे असे रवी शंकर प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@