गोखले पूल दुर्घटना; अस्मिता काटकर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |



मुंबई : अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेतील जखमी महिला अस्मिता काटकर यांचा आज संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अस्मिता यांच्यावर कपूर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. गेल्या पाच दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील गोखले पुलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत पाच प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी अस्मिता काटकर या पुलाच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. काटकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या जिवाला धोका असल्याचे डॉक्टरांनी पूर्वीच स्पष्ट केले होते.

 

नेमकं काय घडलं 'त्या' दिवशी?

 

आपल्या ६ वर्षीय मुलाला अंधेरी पूर्वेकडील परांजपे विद्यालयात सोडून अस्मिता काटकर गोखले पुलावरून प्रवास करत होत्या. त्याचवेळी गोखले पुलाचा काही भाग कोसळला आणि त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. अस्मिता काटकर गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यांचे संपूर्ण शरीर सुजले होते. त्यांच्या डोक्यालादेखील गंभीर दुखापत झाल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले होते. अखेर साडीच्या आधारावर अस्मिता यांची ओळख पटली. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

@@AUTHORINFO_V1@@