समाज परिवर्तनासाठी युवकांनी राजकारणात यावे : प्रणिती शिंदे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |
 

 
 
नागपूर : आज राजकारणात युवकांना मोठी संधी आहे.राजकारणात येऊन समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद युवकांमध्येआहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. ४८ व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळीचे योगदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, अवर सचिव सुनील झोरे तसेच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
 
 
राजकारणात येण्यापूर्वी २००४ साली जाई-जुई संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करण्यास सुरुवात केली व या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला असे शिंदे यावेळी म्हणाल्या. समाजकारणासाठीच राजकारणात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
देशाची एकता हीच देशाची शक्ती आहे. महापुरुषांच्या विचाराचे प्रसारण एका चौकटीत न ठेवता ते प्रसारीत करणे हे प्रत्येक युवकाचे कर्तव्य आहे. मी एक भारतीय आहे. प्रत्येक नागरिकाने स्वाभिमान बाळगून देशाची अखंडता राखण्यात आपली भूमिका बजावली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@