भारत-इंग्लंड क्रिकेट मालिकांना आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |


मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांच्या मालिकांना आजपासून सुरुवात होणार आहे. आजपासून भारत इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार असून त्यानंतर लागोपाठ एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका घेण्यात येणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे नेदरलँड पाठोपाठ आता इंग्लंडवर देखील भारतीय संघ विजय मिळवणार का ? याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानावर आज संध्याकाळी दोन्ही संघातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या टी-२० मालिकेमध्ये एकूण तीन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना आज होणार आहे. यामालिकेसाठी भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, कृणाल पंड्या, यजुवेंद्र चहल, सुरेश रैना, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, सिद्धार्थ कौल, दीपक चहर या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे.

या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका घेण्यात येणार आहे. यामध्ये मालिकेसाठी देखील वरील संघच कायम ठेवण्यात येणार आहे. यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी मात्र संघामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@