पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान म्हणून हवे : कंगना रणावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |

 
 
मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले आयुष्य स्वत: घडवले आहे. त्यांच्या यशामागे त्यांचे कष्ट आहेत आणि ते आपल्या आई वडिलांमुळे नाही तर स्वत:च्या बळावर इथवर पोहोचले त्यामुळे २०१९ मध्ये पुन्हा एकदा तेच पंतप्रधान म्हणून निवडून आले पाहिजेत." अशी इच्छा प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणावत हिने व्यक्त केली आहे. कंगना आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच सिनेसृष्टीत असलेल्या परिवारवादाला तिने संपूर्ण जगासमोर ठाम विरोध केला आहे. त्यामुळे राजकारणातील परिवारवादाल देखील तिचा विरोध आहे, असे तिच्या या वक्तव्यावरुन लक्षात येते.
 
 
 
 
 
केवळ ५ वर्षात त्यांना सत्तेतून बाहेर काढणं योग्य ठरणार नाही, ५ वर्ष स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेशी नसतात असेही ती म्हणाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहर याच्या 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमात तिने करणवर निशाणा साधत सिनेसृष्टीतील परिवारवादावर कठोर टीका केली होती, तेव्हा पासून ती या बाबतीत चर्चेत होती. सिनेसृष्टीप्रमाणेच राजकारणात देखील परिवारवाद दिसतो, त्यावर अप्रत्यक्षरुपात तिने आपले मत व्यक्त केले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या यशामागे त्यांचे आई वडील नाही तर ते स्वत: आहेत, असे तिने म्हटले आहे.
 
सिनेसृष्टीतील अनेक लोकांनी राजकीय़ नेतृत्वांना आपला पाठींबा दर्शवला आहे. मात्र कंगनाने एकदम खुल्यापद्धतीने नरेंद्र मोदी यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र तिच्या या मतामुळे पुन्हा एकदा परिवारवाद या विषयावर चर्चा होणार असे दिसते.
@@AUTHORINFO_V1@@