आवक घटल्याने टोमॅटोचे भाव वधारले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |


 

 

नवी मुंबई: पावसामुळे झालेला विपरीत परिणाम आणि महाराष्ट्र बंद यामुळे भाजीपाला व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे वाशी बाजारातील टोमॅटोचा भाव ५० -६० रुपये किलो इतका झाला आहे.
 

काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक संपामुळे बाजारात येणार्‍या टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे प्रतिकिलो २३ ते २५ रुपयांना मिळणार्‍या टोमॅटोच्या किमती वधारल्या आहेत. इतर राज्यांतून येणारा टोमॅटो कमी प्रमाणात येत असल्याने याचा फटका नागरिकांना बसला आहे. टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने किरकोळ बाजारात विक्रेते चढ्या दराने टोमॅटो विकत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@