लाल किल्ला ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत बंद राहणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
दिल्ली : दिल्ली येथील लाल किल्ला ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१८ दरम्यान सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरक्षितेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यासाठी येथे तयारी करण्यात येत असल्याने काही दिवस येथे पर्यटन बंद करण्यात येणार आहे. 
 
 
सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला असता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर भाषण देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसांपूर्वी सामान्य नागरिकांसाठी लाल किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. लाल किल्ल्यावर आतापासून सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त करण्यात आला असून पोलीस यंत्रणा तेथे सज्ज आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@