पुणे : मराठा मोर्च्याचे परिणाम केवळ मुंबईच नाही तर आता पुण्यात देखील दिसून येत आहेत. पुण्याच्या प्रसिद्ध स्वारगेट बसस्थानकावर काही हिंसक घडामोडी झाल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून आता प्रवाशांना मुंबईला बसने जाता येणार नाही.
सोलापूर मार्गही बंद :
केवळ मुंबईच नाही तर या घडामोडींमुळे सोलापुर मार्गही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरच्या दिशेन जाणाऱ्या प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची अडचण झाली असून आता त्यांना मुंबई सोबतच सोलापूरला देखील बसने जाता येणार नाहीये.
दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या मराठा समाजातील युवकाने गोदावरी नदीत जलसमाधी घेत आत्महत्या केली, त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे आज मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात मराठा क्रांती मोर्चा समितीने बंद पुकारला आहे, मात्र या बंदचे पडसाद महाराष्ट्रातील इतर भागांवर देखील पडत आहेत